मेघवृष्टीत चिंब चिंब भिजण्यापूर्वी
''अवचित आले माझ्या दारी।
संत वारकरी मजवरी संतकृपा झाली॥ ''
असे ''मेघवृष्टी वर्षावे'' या प्रथम लेखामध्ये काव्यसुमनाद्वारे प्रकटले आहे. खरेतर ''संतकृपा'' हीच ती दयार्द्र, सुकोमल, करूणागंधीत मेघवृष्टी आहे. संतांनी आपला उपदेश सर्वांसाठी अत्यंत दयाघन सहृदयतेने केला आहे.