दिनांक:
> मुख्यपान
 
मानवी हक्कांची जाणीव ठेवून कार्यरत असलेली संस्था, स्वयंसेतू रत्नागिरी.
 
> मुख्यपान
  पान 1
दिनांक: 16-04-2010
स्वयंसेतूचे 2009-2010 हे दशकपूर्ती वर्ष आहे. आपल्या समाजातील पिडीत, दुर्बल, घटकांचे शोषण आपल्याला पदोपदी जाणवत असते. त्यांच्या समस्यांचे निराकरण करून सर्वांगीण विकासाला एक डोळस दिशा देण्याच्या हेतूने रत्नागिरी जिल्हा स्तरावर काही समविचारी व्यक्ती 2000 सालापासून सामाजिक कार्य करीत आहेत. 'मानवी हक्क दिनाचे' औचित्य साधून 10 डिसेंबर 2003 रोजी या कार्याचे 'स्वयंसेतू' असे नामकरण करून संस्था स्थापन करण्यात आली.
पिडीत, दुर्बल लोकांचे ओढग्रास्त जीवन, कमालीच दारिद्रय, स्वच्छतेचा-आरोग्याचा अभाव, कुपोषण, अज्ञान, कमालीची अंधश्रध्दा, बेकारी, अपुरा व अनियमित रोजगार, कुटुंबनियोजनाचा अभाव, व्यसनाधीनता, बालमजुरांचे वाढते प्रमाण, अल्पवयीन मुलं व महिलांवर होणारे अत्याचार इत्यादी अनेक समस्या त्यांच्या समोर आ वासून उभ्या आहेत. या लोकांना वर्षानुवर्षे कोणत्याही प्रकारच्या न्यायासाठी झगडावं लागतंच. परंतु त्यांच्या हयातीत हा न्याय मिळणं मुश्कील बनलंय. शासनाच्या सर्वसामान्यांकरता असलेल्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. कित्येकांना तर त्यांच्या मूलभूत गरजाही मिळणं दुरापास्त होऊन जात. कालबाह्य रूढी-परंपरांऐवजी काळानुरूप नवीन विचारप्रवाह त्यांच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं आहे.
या पार्श्वभूमीवर स्वयंसेतू या दोहोंच्यामधील दुवा म्हणून कार्यरत आहे. 8 मार्च 2000 रोजी पहिला कार्यक्रम घेण्यात आला. झोपडपट्टीतील 2 किंवा 3 मुलांवर शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचा तत्कालिन सिव्हिल सर्जन यांच्या यांच्या उपस्थितीत भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला होता. आज या झोपडपट्टीत दोन मुलींवरही महिला शस्त्रक्रिया करून घेत आहेत. झोपडपट्टीत गेली 10 वर्षे दोन मुलांवर सहसा कुणी आपले कुटुंब वाढवलेले नाही हे संस्थेला मिळालेलं बहुमूल्य यश आहे.
सध्या संपूर्ण भारतातील 'मुलींचं घटत प्रमाण' ही ज्वलंत समस्या लक्षात घेऊन स्वयंसेतूतर्फे दशकपूर्ती वर्षानिमित्त 'मुलीच्या जन्माचे स्वागत' हे प्रबोधनपर अभियान सुरू आहे. वर्षभरात 1 हजार मुलींच्या पालकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आहे. आजवर 900 मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यात हे अभियान पोहोचले आहे. या अभियानांतर्गत स्त्री भ्रृणहत्या, मुलीला मिळणारी दुय्यम वागणूक, मुलीच झाल्या म्हणून मातेचा होणार छळ, अशा मातांना माहेरी पाठवून किंवा जबरदस्तीने घटस्फोट देऊन दुसरं लग्न करणं, शासनाच्या विविध योजना त्यांना मिळवून देण इत्यादी बाबतीत प्रबोधन केलं जात. अन्यायग्रास्त महिलांना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन दिलं जात. बहुसंख्य महिलांना दोन मुलांवर कुटुंबनियोजन करण्यास प्रवृत्त केले आहे. 1 किंवा 2 मुलींवर आपलं कुटुंब मर्यादित ठेवू इच्छिणाऱ्या जोडप्यांना या अभियानामुळे प्रोत्साहन मिळालंय.
रत्नागिरी जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील सर्वप्रथम झोपडपट्टीतील महिलांचे बचतगट स्थापन करण्याचं श्रेय स्वयंसेतूला जात. राज्य व केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार, बालसंगोपन, बालिकासमृध्दी, सुवर्णजयंती योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, जननी सुरक्षा योजना यांसारख्या अनेक योजनांचा प्रत्यक्ष लाभ गरजूंना मिळवून देण्यात आला आहे.
स्वयंसेतूतर्फे दरवर्षी महिला व मुलांसाठी शैक्षणिक, आरोग्यविषयक, कायदेविषयक, वैचारिक, पर्यावरणविषयक, लैंगिक शिक्षण, विवाहपूर्व समुपदेशन, इत्यादी चर्चासत्रांचं आयोजन केलं जात. विधवा, परित्यक्ता, घटस्ङ्गोटिता, सर्वधर्मीय महिलांना सामावून घेणारं महिलामंडळ कार्यरत आहे. महिला व झोपडपट्टीतील मुलांसाठी मोङ्गत वाचनालय सुरू आहे. दरवर्षी वाचकवीर म्हणून महिला व मुलांचा गौरव केला जातो.
महिला सक्षमीकरण, महिलांविषयीचे विविध कायदे, पालकप्रबोधन, एड्स प्रबोधन इत्यादी विषयांवर गावागावांतून माहितीपट चर्चासत्र घेतली जातात. संस्थेच्या कौटुंबिक सल्ला केंद्रामार्फत आजवर हजारो समस्याग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय कार्य : ुरत्नागिरी शहरातील एका मनोरुग्ण महिलेला मनोरुग्णालयात दाखल करून तिचा पत्ता शोधून तिला हक्काचे घर मिळवून दिले. ु पूरग्रस्त, अपघात ग्रस्तांसाठी तातडीची मदत. ु स्वयंरोजगार योजनेंतर्गत विशेष घटकांतील 60 वर्षांवरील महिलांना अनुदानाचा लाभ. ु एका गाजलेल्या वासनाकांडातील अत्याचारित अल्पवयीन मुलीचे पुनर्वसन. ु झोपडपट्टीत प्रौढ साक्षरता वर्ग. ु गरजू व हुशार मुलांना दत्तक ु 30 मे 2006 च्या अतिवृष्टीत पाण्याखाली गेलेल्या झोपडपट्टीवासीयांचे 15 दिवसांकरता पुनर्वसन. ु विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेला कुमारी माता व नवजात बाळाचा गंभीर प्रश्न हाताळून त्या तरुण-तरुणींचा विवाह जुळवण्यात यश. ु एड्स विषयावर 27 कथाकथनाचे प्रयोग. ु झोपडपट्टी व जिल्ह्यातील निरीक्षणगृहांमध्ये मुलांसाठी खेळघर सुरू ु एक पालक असलेल्या मुलांना पूर्ण कुटुंब मिळावे या हेतूने पुनर्विवाह यशस्वी. ुअल्पवयीन, कुमारी मातांचे पुनर्वसन. ु गरजू व दुर्बल घटकांना मोफत व तत्पर कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शन व संरक्षण ु झोपडपट्टी पुर्नवसन योजनेचा पाठपुरावा.
स्वयंसेतू ही विनाअनुदानित संस्था आहे. समाजातील हितचिंतक व देणगीदार यांनी स्वेच्छेने दिलेल्या देणगीवरच संस्था कार्यरत आहे.
  पान 1
Go To Top Of Page