![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
| यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली ! | |||
|
|||
| > मुख्यपान | |||
|
|||
| दिनांक: 16-04-2010 | |||
| केवळ शैक्षणिक प्रगती म्हणजेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असं जणू काही एक समीकरणच सध्या समाजमान्य झालेलं असल्यानं संपूर्ण समाजच एका चुकीच्या मार्गाने किंबहुना मृगजळाच्या मागे धावतोय अशी केविलवाणी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालीय. यातून 'मुलांच्या आत्महत्या' हा ज्वलंत प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागलाय. याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रत्यक्ष मुलं, पालक, शिक्षक आणि समाजातील इतर घटक एकमेकांना विचारताहेत. केवळ विचारून थांबत नाहीयेत तर त्याचं खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करताहेत. हे मी शिक्षक, पालक, मुलं यांच्याशी सुसंवाद साधताना ज्यावेळी प्रत्यक्ष पाहील, ऐकलं त्यावेळी या सर्वांच्या अज्ञानाची खरोखर कीव करावीशी वाटली. खर तर या सर्वांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करण्याची खरी गरज आहे. | |||
![]() |
गेल्या दशकात मुलांच्या संदर्भात जगभर घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना, जिल्हा बालकल्याण समितीवर गेली 7 वर्षे मुलांची विविध प्रकरणं हाताळताना भविष्यातील सूचक, विपरीत परिस्थितीची आम्हांला पूर्वकल्पना आलेली होती. मुलांचा जो मानसिक, भावनिक कोंडमारा होतोय, त्याचा उद्रेक हा होणारच याची पूर्ण खात्री होती. म्हणूनच 2006 पासून आम्ही पालक प्रबोधनाला सुरुवात केली. जे पालक यातून वेळीच सावध झाले त्यांनी आम्हांला धन्यवाद दिले परंतु ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू शकलो नाही त्यांनी खंतही व्यक्त केली. | ||
|
|||
|
|||
| Go To Top Of Page | |||