![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| आंजर्ले येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात चाकरमानी सरसावले |
| दिनांक: 29-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : आंजर्ले येथील नियोजित औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आंजर्ले परिसरातील बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा पोल, साकुर्डे, सातांबा आदी गावातील व अन्य परिसरातील गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकतीच या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली असली तरी कंपनीकडून पुन्हा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. |