![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त | |
| दिनांक: 28-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते आडवली या भागात काही ठिकाणी मोठया प्रमाणावर दरडी कोसळल्या असून या ठिकाणी कोसळलेली माती बाजूला काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून तरी देखील हे काम पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन दिवस लागतील. यानंतर विशेष चाचणी घेतल्यानंतर हा रेल्वेमार्ग पुर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नागदत्त यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. निवसरचा प्रश्न दरवर्षी कोकण रेल्वेला अडचणीचा ठरत असल्याने त्या क्षेत्राकडे कोकण रेल्वेचे विशेष लक्ष आहे. याबाबत काही भूगर्भ शास्त्रज्ञांचाही सल्ला घेण्यात आला होता. यासाठी कोकण रेल्वेने एक खास समिती नेमली असून त्यांनीही काही उपाययोजना सुचविल्या असून त्यावर आणखी अभ्यास सुरू असून त्यामध्ये 38 कोटी रुपये खर्च करून पुल बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. कोकण रेल्वेच्या मार्गापैकी मुंबई ते रत्नागिरी व आडवली ते मडगांव-बेंगलोर हा मार्ग व्यवस्थित असून केवळ रत्नागिरी ते आडवली मार्गावर ही रेल्वेसेवा बंद आहे. त्यामुळे काही गाडया रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही गाडया अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. दरम्याने कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी रविवारी निवसर, असोड आदी ठिकाणाची पाहणी केली. मात्र तायल यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. |
![]() |