![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| दरवर्षी भेडसावणाऱ्या निवसर प्रश्नात खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले |
| दिनांक: 28-07-2010 |
![]() ![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : दरवर्षी पावसाळयात कोकण रेल्वेला निवसर येथे माती खचण्याच्या प्रकारामुळे आपत्तीला तोंड द्यावे लागते. यावेळीही कोकण रेल्वेची वाहतूक रत्नागिरी ते आडवली अशी ठप्प झाली आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कोकण रेल्वेच्या प्रश्नावर खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी रेल्वेच्या बोर्डाचे अध्यक्ष विवेक सहाय यांची भेट घेवून त्यांच्याशी कोकण रेल्वेच्या प्रश्नाबाबत व निवसरबाबत चर्चा केली. त्यामुळे आपण या प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी निवसर गावच्या डोंगराच्या पलिकडे जावून नवीन मार्ग तयार करण्याच्यादृष्टीने चर्चा केली. यासाठी अंदाजे 100 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय मुंबई- सावंतवाडी रेल्वे गणपतीसणापूर्वी सुरू करण्यासाठीही त्यांनी बोर्डाचे अध्यक्ष सहाय यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. |