![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| आमदारांच्या गावांसह अन्य आठ गावात सुरू होणार घरपोच धान्यवाटप योजना |
| दिनांक: 27-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : शासनाने घरपोच धान्य वाटपाची घोषणा केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात तालुक्याचे आम. उदय सामंत यांच्या गावासह अन्य आठ गावात ही योजना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आ. उदय सामंत यांनी दिली. प्रचलित धान्य वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि थेट शिधापत्रिकांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी ही योजना आखण्यात आली असून त्याचा शुभारंभ पुढील महिन्यात पाली येथे होणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्याचे वितरण हे तालुक्यातील गोदामातून स्वस्त धान्य दुकानापर्यंत केले जाते. मात्र आता या योजनेमध्ये हे धान्य गरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन घरपोच धान्य योजना सुरू करण्यात येणार आहे.गावात किंवा वाडीत दोन महिन्याचे धान्य ग्रामसभेसमोर दिले जाणार आहे. |