![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोकण रेल्वेसमोर नवे संकट, चिंद्रवलीजवळील डोंगराला मोठया भेगा, बोगद्याला धोका |
| दिनांक: 27-07-2010 |
![]() ![]() |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेला मोठया प्रमाणावर बसला असून या मार्गावरून जाणाऱ्या रत्नागिरी ते मडगाव हा मार्ग बंद असल्याने रेल्वेगाडया रद्द करण्यात आल्या असून काही गाडयांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. फक्त पॅसेंजर सेवा रत्नागिरीपर्यंत चालू असून यामुळे कोकण रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच निसर्गाच्या प्रकोपामुळे कोकण रेल्वे अडचणीत आली असून गेल्या चार दिवसात लागोपाठ दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. निवसर स्टेशननजिक कोसळलेली मोठी दरड बाजूला करण्यासाठी कोकण रेल्वेला बुधवारपर्यंत कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. या ठिकाणी युध्द पातळीवर दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी आता निवसरनजिक असलेल्या कोंडवी बोगद्याच्या डोंगराच्या वरच्या बाजूला मातीला तडे गेले असून हा भाग केव्हाही रेल्वे मार्गावर येण्याची शक्यता दिसत आहे. या भेगा चिंद्रवली शाळेच्या भिंतीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही माती खाली येण्याची शक्यता दिसत आहे. निवसरजवळ कोसळलेल्या दरडीची माती बाजूला केल्यानंतरही कोकण रेल्वेची वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमी दिसत आहे. |