![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य, वाहनचालकांत नाराजी |
| दिनांक: 26-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर काही ठिकाणी रस्ता प्रचंड खराब झाला असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकांच्यात मोठया प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबानजिक वारूळ व त्यापुढे सात आठ कि. मी. परिसरात पावसापूर्वी रस्ता दुरूस्तीचे काम घेण्यात आले होते व काही ठिकाणी साईडपट्टया दुरूस्त करण्यात आल्या होत्या. मात्र पहिल्याच पावसात या कामाची पूर्णतः वाताहत झाली असून वारूळ, चांदोली आदी परिसरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण होवून बसले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कशेडी बंगला ते चेकपोस्ट या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. |