![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| शासकीय पैशाची उधळपट्टी, काढलेला गाळ परत नदीपात्रात |
| दिनांक: 26-07-2010 |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : पावसापूर्वी नदीतील गाळ काढून पात्र स्वच्छ करण्याची हाती घेतलेली मोहीम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नदीपात्रातील गाळ वाढल्याने या वर्षी लाखो रुपये खर्च करून वाशिष्ठी पुलाजवळील गाळ काढण्यात आला परंतु हा गाळ काढल्यानंतर नदीकिनारी ठेवण्यात आला. गेल्या काही दिवसात पडणाऱ्या पावसाने हा गाळ परत नदीपात्रात गेला आहे. जिल्ह्यात अनेक भागात काढलेल्या गाळाच्या बाबतीत हीच परिस्थिती असून शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात असून संबंधित यंत्रणा नदीतील गाळ कायमस्वरूपी काढण्यासाठी आपला गाळा काढण्यात गुंतले असल्याचे दिसत आहे. |