![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वे थंडावली, रत्नागिरीच्या पुढे वाहतूक बंद |
| दिनांक: 26-07-2010 |
![]() ![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर यावेळच्या पावसात निसर्गाने कोकण रेल्वेला चांगलाच दणका दिला असून लागोपाठ येणाऱ्या अडचणींमुळे कोकण रेल्वेची वाहतूक रत्नागिरीच्या पुढे ठप्प झाली असून ही वाहतूक पूर्ववत होण्यास काही दिवस जातील असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसात कोकण रेल्वेच्या निवसर स्थानकापासून कोकण रेल्वे महामंडळापुढे अडचणींना सुरूवात झाली. सुरूवातीच्या काही काळात किरकोळ दरडी पडण्याचे व निवसर स्थानकात काही प्रमाणात रूळ खचण्याचे प्रकार घडले. मात्र कोकण रेल्वे महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही तासातच वाहतूक सुरू करण्यात यश मिळविले होते. |
![]() ![]() |
| गेले सात दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेसमोर नैसर्गिक आपत्तीचेच डोंगर आले. सुरूवातीला निवसर स्थानकातील रूळ व अन्य भाग भराव गेल्याने सात ते आठ फुटाने खचला. हे काम सतत रात्रंदिवस करून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न मारूसागर एक्स्प्रेस अडकल्याने फसला. त्यानंतर अंजणारीनजिक मोठी दरड कोसळल्याने व अन्य भागात काही प्रमाणात दरडी कोसळल्याने ही वाहतूक आता रत्नागिरीच्या पुढे पूर्णपणे ठप्प झाली आहे कोकण रेल्वे महामंडळ युध्द पातळीवर काम करून ही वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करीत असली तरी निसरर््गाच्या प्रकोपापुढे कोकण रेल्वेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. |