![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| प्रवाशांच्या मदतीला धावली एस.टी. |
| दिनांक: 25-07-2010 |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : निवसर (ता. लांजा) येथे रेल्वे रूळ दहा ते बारा फूट खचल्याने कोकण रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे सुमारे आठ रेल्वे गाडया रद्द केल्याचे समजते. त्यामुळे रेल्वे वाहतूक अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. काही गाडया रत्नागिरी रेल्वे स्थानकातून परत मुंबई, तर आडवली (ता. लांजा) येथून परत मडगांवकडे वळवून रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात आली. प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून रेल्वेच्या मागणीनुसार एस.टी. महामंडळाने 30 जादा गाडया सोडल्या आहेत. |