![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| पुरामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडीत |
| दिनांक: 25-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : पावसाची संततधार सुरूच असल्याने अनेक ठिकाणी वीज गायब असून जवळपास 10 हजार ग्राहकांना वीज पुरवठा खंडित झाला होता. अनेक भागात ट्रान्स्फॉर्मपर्यंत पुराचे पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला. जवळपास 12 ते 15 गावांमधील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला असून तो पाऊस ओसरल्याशिवाय सुरू करणे अशक्य होणार आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे महावितरणचा अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला. पहिल्या दोन दिवसात जवळपास 18 हजार ग्राहकांना खंडीत वीज पुरवठयाला सामोरे जावे लागले. त्या त्या भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात महावितरणला यश आले तरीही पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. |