![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर |
| दिनांक: 24-07-2010 |
![]() ![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मात्र हळुहळू चिपळूण, खेड, राजापूर परिसरात जनजीवन हळुहळू सुरळीत होवू लागले आहे. मात्र गेल्या 24 तासात पावसाने रत्नागिरी तालुक्याला झोडपले असून रत्नागिरी तालुक्यात गेल्या 24 तासात 206.3 मि. मि. पाऊस पडला. याचा फटका टेंभ्येपुल, पोमेंडीपुल, चांदेराई, हरचिरी, सोमेश्वर, उंबरे, करबुडे आदी भागाला बसला आहे. गुहागर येथील पुजा साटले ही छोटी मुलगी शाळेतून परत येत असताना वाहून गेली. याशिवाय अनेक ठिकाणी घरांचे व गोठयांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. रत्नागिरी -कोल्हापूर मार्ग निळे येथे पाणी भरल्याने अणुस्कुरा कोल्हापूरमार्ग देखील बंद आहे. दापोली-खेड मार्गावर देखील पाणी भरले आहे. कालच्या पावसात वरवडे कळझोंडी येथील गोपाळ गावणकर हा इसम नदीपात्रातून जात असताना वाहून गेला. टेंभ्येपुल परिसरात पाच कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी चांदेराई येथील 29 कुटुंबांना, हरचिरी येथील 25 कुटुंबातील 135 जणांना, संगमेश्वर येथील 41 कुटुंबातील 255 जणांना, उंबरे येथील दोन घरातील 15 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. खेड, नातूनगर, तुळशी विन्हेरे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. उंबरे येथील दोन घरांचे, करबुडे येथील एका घराचे नुकसान झाले आहे. ताकवली- शिरशिंबी हा मार्ग झाड पडल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मंडणगड-पणदेरी या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली असून मंडणगड-म्हाप्रळ मार्गे ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात चिपळूण 98.0, संगमेश्वर 191.0, रत्नागिरी 206.3, लांजा 199.0, राजापूर 96.0, गुहागर 90.0, खेड 70.0, दापोली 49.4, मंडणगड 82.6 मि. मि. अशा पावसाची नोंद झाली आहे. |