दिनांक:
 
पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
दिनांक: 24-07-2010
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मात्र हळुहळू चिपळूण, खेड, राजापूर परिसरात जनजीवन हळुहळू सुरळीत होवू लागले आहे. मात्र गेल्या 24 तासात पावसाने रत्नागिरी तालुक्याला झोडपले असून रत्नागिरी तालुक्यात गेल्या 24 तासात 206.3 मि. मि. पाऊस पडला. याचा फटका टेंभ्येपुल, पोमेंडीपुल, चांदेराई, हरचिरी, सोमेश्वर, उंबरे, करबुडे आदी भागाला बसला आहे. गुहागर येथील पुजा साटले ही छोटी मुलगी शाळेतून परत येत असताना वाहून गेली. याशिवाय अनेक ठिकाणी घरांचे व गोठयांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. रत्नागिरी -कोल्हापूर मार्ग निळे येथे पाणी भरल्याने अणुस्कुरा कोल्हापूरमार्ग देखील बंद आहे. दापोली-खेड मार्गावर देखील पाणी भरले आहे.
कालच्या पावसात वरवडे कळझोंडी येथील गोपाळ गावणकर हा इसम नदीपात्रातून जात असताना वाहून गेला. टेंभ्येपुल परिसरात पाच कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी चांदेराई येथील 29 कुटुंबांना, हरचिरी येथील 25 कुटुंबातील 135 जणांना, संगमेश्वर येथील 41 कुटुंबातील 255 जणांना, उंबरे येथील दोन घरातील 15 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. खेड, नातूनगर, तुळशी विन्हेरे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. उंबरे येथील दोन घरांचे, करबुडे येथील एका घराचे नुकसान झाले आहे. ताकवली- शिरशिंबी हा मार्ग झाड पडल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मंडणगड-पणदेरी या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली असून मंडणगड-म्हाप्रळ मार्गे ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात चिपळूण 98.0, संगमेश्वर 191.0, रत्नागिरी 206.3, लांजा 199.0, राजापूर 96.0, गुहागर 90.0, खेड 70.0, दापोली 49.4, मंडणगड 82.6 मि. मि. अशा पावसाची नोंद झाली आहे.
 
 
 
दिनांक: 24-07-2010
> कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
> पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
> बिबटयाचा महिलेवर हल्ला, महिला जखमी
> श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा
> गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार?
> डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान
> जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे
> जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांचा वाढदिवस आगळया उपक्रमाने साजरा
> मिऱ्या बंधाराप्रकरणी ग्रामस्थ 15 ऑगस्ट उपोषणाला बसणार
> महावितरणची हेल्पलाईन
> गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले लोकमान्य टिळकांना अभिवादन
> विकासकामांसाठी आक्रमक रहावे, भाजपा प्रदेश चिटणीस बाळ माने
दिनांक: 23-07-2010
> जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू, शिवणे बुद्रूक येथे डोंगर खचला, गावांचे संपर्क तुटले, कोकण रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम, पावसाचे आतापर्यंत 15 बळी
> वाहनाने धडक दिल्यामुळे तरूण आंबा व्यापाऱ्याचा मृत्यू
> दापोलीतील ए. जी. हायस्कूलची आणखी एक भिंत कोसळली
> अतिवृष्टीमुळे भाटिमिऱ्या बंधाऱ्याला तडाखा
> मुंबई-गोवा चारपदरी रस्त्याचे काम रेंगाळणार?
> जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीचा वाद आता राज्य पातळीवर, नव्या निवडीला स्थगिती?
> जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरली
दिनांक: 22-07-2010
> निवसर स्थानकात रुळ खचले, राजापूर जवळ दरड कोसळली कोकण रेल्वे वाहतूक बंद
> रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती चिपळूण, राजापूर, खेड परिसरात पाणी भरले, अतिवृष्टीची शक्यता
> रत्नागिरी शहरातील वाटद-खंडाळा येथे मलेरियाची साथ 200 रूग्ण आढळले
> आईच्या नजरचुकीने दिलेल्या औषधाने चिमुकला मृत्यूमुखी
> वार्षिक सवलत योजनेला अल्प प्रतिसाद
> माजी जि.प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
> लोटे परिसरात केमिकल कंपनीला आग, अनर्थ टळला
> देवरूख येथील प्रसिध्द डॉ. उपाध्ये यांचे निधन
> स्वास्थ्य विमा योजनेची चौकशी समितीकडून पाहणी
> देवगड परिसरातील समुद्रकिनारी स्फोटकांनी भरलेले बॉक्स सापडल्याने खळबळ
> वादात सापडलेल्या मुख्याधिकाऱ्यांची अखेर बदली
दिनांक: 21-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, सिंधुदुर्गातही विक्रमी पाऊस
> चिपळूण अर्बन बँकेला पुरस्कार जाहीर
> रत्नागिरी जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू
> पत्नीचा विरह असह्य झाल्याने पतीची आत्महत्या
> पोमेंडी बुद्रूक जरस्वराज्य प्रकल्पात गैरव्यवहार, अध्यक्षांची ठेकेदाराविरूध्द तक्रार
> दापोलीतील धोकादायक डोंगराची भूगर्भशास्त्रज्ञांकडून पाहणी
> जिल्ह्यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
> जिल्ह्यातील अनधिकृत शाळांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार : जि.प. अध्यक्षा सौ. रचना महाडिक
> जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन
> मुंबई-सावंतवाडी रेल्वेसंदर्भात ना. राणे लक्ष घालणार