दिनांक:
 
कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
दिनांक: 24-07-2010
रत्नागिरी, (रूबिन मुजावर) : कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून दर पावसाळयात कोकण रेल्वे महामंडळाला अत्यंत डोकेदुखी ठरलेले निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व स्टेशन परिसरातील रूळ काल रात्रौ सुमारे 10 फूट खचले गेल्याने मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कोकण रेल्वेने या मार्गावरील अनेक गाडया रद्द केल्याने संपूर्ण कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या दुरूस्तीचे काम कोकण रेल्वेने युध्दपातळीवर हाती घेतले असून सुमारे 500 कर्मचारी, अधिकारी व कोकण रेल्वेची यंत्रणा अहोरात्र काम करीत असून तरीदेखील हे काम पूर्ण होण्यास अंदाजे दोन दिवस जातील असा अंदाज कोकण रेल्वेच्यावतीने वर्तविण्यात येत आहे. मात्र परिस्थिती पाहता अधिक काळ रेल्वेसेवा बंद राहू शकते असे चित्र दिसत आहे. दरम्याने निवसर ग्रामस्थांच्यामध्येही कोकण रेल्वेबाबत मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून निवसर परिसरात दरवर्षी पावसाळयात रेल्वे रूळ खचण्याचे व स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला भेगा पडण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत. या स्टेशनची निर्मिती करताना स्टेशनजवळ असलेल्या नदीच्या काही प्रवाहांवर भर घालण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी सतत पाऊस पडला की रूळ खचण्याचे व भेगा पडण्याचे प्रकार होतात. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वेने अनेकवेळा भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत पाहणी करून त्यावर करोडे रुपये खर्च करून उपाययोजना केल्या होत्या. परंतु या उपाययोजना आता फोल ठरत आहेत. याशिवाय स्टेशनपासून जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या घरांवरही त्याचे विपरित परिणाम होत असून कोकण रेल्वेचा वाहतुकीमुळे व भेगा पडल्यामुळे नागरिकांच्या घरांनाही भेगा पडत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी असून त्यांच्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
गेल्या चार दिवसांपासून निवसर स्थानकात रेल्वे रूळ खचण्याचे व भेगा पडण्याचे प्रकार सुरू झाले होते. सुरूवातीला हा रूळ सहा इंचांनी खचला होता. त्यानंतर कोकण रेल्वेने आपली ही यंत्रणा कामाला लावून डागडुजी केली होती व धिम्या गतीने वाहतूक चालू ठेवली होती. त्यातच दुरूस्ती करणारे मशिनही काल रूळावरून घसरले होते. परंतु काल रात्रौ ते पहाटेच्या दरम्याने या निवसर स्थानकाचा संपूर्ण प्लॅटफॉर्मच खचला गेला आहे. प्लॅटफॉर्मच्या ठिकाणचे सर्व काँक्रीट खचले असून त्याठिकाणी फक्त माती राहिली आहे. रेल्वेचे ट्रॅकदेखील 10 फुटांनी खचले असून वरती फक्त लोखंडी ट्रॅक शिल्लक दिसत आहेत व त्याच्याखालचा भराव व दगड वाहून गेल्याने मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय आजुबाजूच्या ग्रामस्थांच्या घरांनाही तडे गेल्याने ग्रामस्थांनीही त्या ठिकाणी धाव घेतली आहे. याबाबत कायमचा तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांनी अंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूणच निवसर स्थानकाजवळ गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून कोकण रेल्वेने शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांच्या लांब पल्ल्याच्या आठही गाडया रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई-कारवार, कारवार-मुंबई, जाणारी-येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस व मत्स्यगंधा एक्स्प्रेस, नेत्रावदी एक्स्प्रेस आदींचा यामध्ये समावेश आहे. काही पॅसेंजर गाडया रत्नागिरीपर्यंत सुरू ठेवण्यात येत असल्याचे कोकण रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले. मात्र एवढी परिस्थिती असूनही कोकण रेल्वेकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात येत नाही. विधानसभेतही राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी निवसर स्थानकाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
 
 
 
दिनांक: 24-07-2010
> कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
> पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
> बिबटयाचा महिलेवर हल्ला, महिला जखमी
> श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा
> गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार?
> डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान
> जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे
> जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांचा वाढदिवस आगळया उपक्रमाने साजरा
> मिऱ्या बंधाराप्रकरणी ग्रामस्थ 15 ऑगस्ट उपोषणाला बसणार
> महावितरणची हेल्पलाईन
> गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले लोकमान्य टिळकांना अभिवादन
> विकासकामांसाठी आक्रमक रहावे, भाजपा प्रदेश चिटणीस बाळ माने
दिनांक: 23-07-2010
> जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू, शिवणे बुद्रूक येथे डोंगर खचला, गावांचे संपर्क तुटले, कोकण रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम, पावसाचे आतापर्यंत 15 बळी
> वाहनाने धडक दिल्यामुळे तरूण आंबा व्यापाऱ्याचा मृत्यू
> दापोलीतील ए. जी. हायस्कूलची आणखी एक भिंत कोसळली
> अतिवृष्टीमुळे भाटिमिऱ्या बंधाऱ्याला तडाखा
> मुंबई-गोवा चारपदरी रस्त्याचे काम रेंगाळणार?
> जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीचा वाद आता राज्य पातळीवर, नव्या निवडीला स्थगिती?
> जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरली
दिनांक: 22-07-2010
> निवसर स्थानकात रुळ खचले, राजापूर जवळ दरड कोसळली कोकण रेल्वे वाहतूक बंद
> रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती चिपळूण, राजापूर, खेड परिसरात पाणी भरले, अतिवृष्टीची शक्यता
> रत्नागिरी शहरातील वाटद-खंडाळा येथे मलेरियाची साथ 200 रूग्ण आढळले
> आईच्या नजरचुकीने दिलेल्या औषधाने चिमुकला मृत्यूमुखी
> वार्षिक सवलत योजनेला अल्प प्रतिसाद
> माजी जि.प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
> लोटे परिसरात केमिकल कंपनीला आग, अनर्थ टळला
> देवरूख येथील प्रसिध्द डॉ. उपाध्ये यांचे निधन
> स्वास्थ्य विमा योजनेची चौकशी समितीकडून पाहणी
> देवगड परिसरातील समुद्रकिनारी स्फोटकांनी भरलेले बॉक्स सापडल्याने खळबळ
> वादात सापडलेल्या मुख्याधिकाऱ्यांची अखेर बदली
दिनांक: 21-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, सिंधुदुर्गातही विक्रमी पाऊस
> चिपळूण अर्बन बँकेला पुरस्कार जाहीर
> रत्नागिरी जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू
> पत्नीचा विरह असह्य झाल्याने पतीची आत्महत्या
> पोमेंडी बुद्रूक जरस्वराज्य प्रकल्पात गैरव्यवहार, अध्यक्षांची ठेकेदाराविरूध्द तक्रार
> दापोलीतील धोकादायक डोंगराची भूगर्भशास्त्रज्ञांकडून पाहणी
> जिल्ह्यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
> जिल्ह्यातील अनधिकृत शाळांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार : जि.प. अध्यक्षा सौ. रचना महाडिक
> जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन
> मुंबई-सावंतवाडी रेल्वेसंदर्भात ना. राणे लक्ष घालणार