Javascript DHTML Image Web Scroller Powered by dhtml-menu-builder.com
 
  ब्रेकींग न्यूज- जिल्हा विकासाच्या स्वप्नातील शिलेदार ठरवण्यासाठी मतदान सुरु | दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या | जेलमधून पळालेल्या आरोपीला युपी पोलिसांनी दिले सोडून | काळबादेवीत वाळू माफियांकडून ग्रामस्थांना मारहाण
    दिनांक:
 
 
सविस्तर वाचा
सविस्तर वाचा
 
 
 
 
 
 
 
 
रत्नागिरी दर्शन
सवि्तर वाचा
सवि्तर वाचा
दिनांक: 07-02-2012
जिल्हा विकासाच्या स्वप्नातील शिलेदार ठरवण्यासाठी मतदान सुरु
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यातील 1769 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या स्वप्नातील विकासाचे शिलेदार कोण याचा कौल सकाळी 7.30 वाजल्यापासून देण्यास सुरुवात केली.
सविस्तर वाचा
 
कलाकाराने करियर आणि हौस यातील मध्य स्वीकारला पाहिजे : ऍड. विलास पाटणे
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कलाकार म्हणून करियर करण्यास इच्छुक असलेल्यांनी हौस आणि करियर यातील सुवर्णमध्य स्वीकारुन व्यक्तीमत्वाला आकार दिला पाहिजे.
सविस्तर वाचा
 
दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या
लांजा, (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने पन्हळे येथील तृप्ती श्रीकांत इंदुलकर या 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
सविस्तर वाचा
 
चिरा भरलेला ट्रक उलटून कामगार महिलेचा मृत्यू
मंडणगड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील घुमरी विहिर गावालगत एका अवघड वळणावर ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकमध्ये हौद्यात बसलेल्या 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला.
सविस्तर वाचा
 
सात्वीणच्या रानात सापडला मानवी सांगाडा
खेड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सात्वीण गावात वन विभागाच्या जागेत मानवी सापळा आढळून आला आहे. वन विभागाच्या जागेत लावलेल्या झाडांची देखरेख करण्यासाठी
सविस्तर वाचा
 
भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस आणि तालुकाध्यक्षांनी दिले राजीनामे
चिपळूण, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावरच भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैभव वीरकर व तालुकाध्यक्ष योगेश जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे.
सविस्तर वाचा
 
जेलमधून पळालेल्या आरोपीला युपी पोलिसांनी दिले सोडून
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेश पोलिसांनी पकडलेल्या कैदी अनुजकुमार चव्हाण याला परस्पर सोडून देण्यात आले. त्यामुळे या कैद्याला आणण्यास गेलेले रत्नागिरीचे पोलीस पथक हात हलवत परत आले.
सविस्तर वाचा
 
सार्वजनिक बांधकाम आणि रनपच्या वादात दुभाजकावरील लॉन करपतेय
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दुभाजकांवरील लॉन करपून गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या वादात त्याची देखभाल होत नसल्याने हे सुंदर लॉन करपून जात आहे.
सविस्तर वाचा
 
काळबादेवीत वाळू माफियांकडून ग्रामस्थांना मारहाण
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : महसुल यंत्रणेसह पोलिसांकडूनही काळबादेवी परिसरात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम म्हणून हे वाळू माफिया शिरजोर झाले आहेत.
सविस्तर वाचा
 
शिरगावातील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्रीराम भावे यांचे निधन
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : शहरालगतच्या शिरगाव येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्रीराम विठ्ठल भावे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सविस्तर वाचा
 
शहरात अनधिकृत हातगाडयांचा सुळसुळाट
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी शहरामध्ये सुमारे 350 हातगाडया रस्त्यांवर व्यवसाय करत आहेत. यातील सुमारे 50जणांकडेच फिरत्या विक्रेत्याचा परवाना आहे.
सविस्तर वाचा
 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी चिपळूणला अधिक पसंती
चिपळूण, (प्रतिनिधी) : चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या 85व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात पुढील 86व्या संमेलनाच्या ठिकाणाची चर्चा झाली.
सविस्तर वाचा
 
भाटये येथील रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना होतोय धुळीचा त्रास
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी- पावस मार्गावर भाटये येथे रस्त्याचे काम सुरु आहे. या कामामुळे येथून येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनचालकांना उडणाऱ्या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर वाचा
 
जैतापूर अणुऊर्जा विरोधातील आंदोलनात फूट पाडण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न
राजापूर, (प्रतिनिधी) : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरु केले आहेत.
सविस्तर वाचा
 
थोडक्यात महत्वाचे
रायगड
जि.प. अध्यक्ष पंडित पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराने रायगड जिल्हा त्रस्त : ना. तटकरे
मुरुड-जंजिरा (प्रतिनिधी) ः रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंडित पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराने संपूर्ण रायगड जिल्हा त्रस्त झाला आहे. पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाल्या की, ठराविक कंपनीचे पाईप खरेदी करण्याचा त्यांचा फार आग्रह असतो. पाणी योजनेचा निधी राज्य व केंद्राचा, मात्र रुबाब मात्र पंडित पाटील यांचा. याच प्रकाराला आता जनता कंटाळली आहे. जिल्हा परिषदेतील भ्रष्ट राजवट उलथवून टाकून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व संपुष्टात आणणारच व या निवडणुकीचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला दोन तृतीयांश बहुमत मिळालेले असेल व जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच असेल, असा आत्मविश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री ना. सुनील तटकरे यांनी केले. ते राजपुरी येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मोठया प्रमाणात मुस्लिम समाज उपस्थित होता.
 
50 लाख रुपये किंमतीचे रक्तचंदन कंटेनरसह जप्त
पनवेल (प्रतिनिधी) ः पनवेलजवळील गुळसुंदे गावाच्या हद्दीतील एका कंटेनरमध्ये रक्तचंदनाचा साठा भरत असताना वन विभागाच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून लाखो रुपये किंमतीचे रक्तचंदन हस्तगत केले आहे. आंध्रप्रदेशातून आलेल्या ट्रकमध्ये (नं. एपी 16 एक्स 1332 व एचपी 35 यू 3577) रक्तचंदनाचा 20 ते 25 टन साठा भरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या रक्तचंदनाची बाजारी किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे.
 
भाडोत्री गुंडांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धुलाई
खोपोली (प्रतिनिधी) ः खालापूर गटात व सांजगाव पंचायत समितीच्या गणात शिवसेनेचे उमेदवार उल्हास भुर्के यांना पराभव समोर दिसू लागल्याने मतदारांवर दहशत निर्माण करण्यासाठी भुर्के यांनी मुंबईवरुन आणलेल्या भाडोत्री गुंडांचा उपयोग केला. मात्र पालकमंत्री ना. सुनील तटकरे यांनी दोनच दिवसांपूर्वीच गुंडगिरीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. तो इशारा अंमलात आणत राष्ट्रवादीच्या सांजगाव विभागातील कार्यकर्त्यांनी काल रात्री मुंबईहून आलेल्या भाडोत्री गुंडांची धुलाई करत वाहनांचीही तोडफोड केल्याने परिसरात तणावसदृश्य परिस्थिती आहे.
 
61 जि.प. व 124 पं.स. जागांचेभवितव्य आज ठरणार
अलिबाग (प्रतिनिधी) ः रायगड जिल्ह्यातील 61 जिल्हा परिषद आणि 124 पंचायत समितीसाठी मतदान 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठीच्या 190 तर पंचायत समितीसाठी उमेदवारी करणाऱ्या 380 अशा एकूण 570 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. निवडणुकीचा निकाल 17 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. जिल्ह्यात एकूण 14 लाख 24 हजार 362 मतदार 2 हजार 124 मतदान केंद्रांवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावतील.
 
बोगस डॉक्टरने टोचलेल्या न्युमोनियाच्या लसीमुळे अनेक मुलांना बाधा
पनवेल (प्रतिनिधी) ः लहान मुलांना 3 हजार रुपये किंमतीच्या न्युमोनियाची लस अवघ्या 1100 रुपयांत टोचल्यानंतर मुलांना टोचलेल्या लसीची बाधा झाल्याने पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मुलांच्या पालकांनी पनवेल पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या डॉक्टरच्या व्हिजीटींग कार्डवर पदवी लिहिण्यात आली आहे, मात्र महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे करण्यात येणारा नोंदणी क्रमांक लिहिण्यात आला नव्हता. लसीची बाधा झालेल्या एका मुलाला वाशी येथील कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. लस टोचल्यानंतर मुलाच्या अंगावर गोवर आजाराप्रमाणे पुरळ उठून मुलांची जीभ लालबुंद झाली होती.
 
मुंबई
मुख्यमंत्र्याच्या टीकेकडे राष्ट्रवादीने केले दुर्लक्ष
मुंबई (प्रतिनिधी) ः शरद पवार यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी काँग्रेस पक्ष फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे महाराष्ट्राचे वाटोळे झाले, अशी टीका काँग्रेसकडून झाल्यानंतरही राष्ट्रवादीने या टीकेवर मौन पाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेवर उत्तर देण्याचे टाळले तर राष्ट्रवादीचा इतर कोणताही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.
 
हिरे चोरणाऱ्या व्यापाऱ्याला अटक
मुंबई (प्रतिनिधी) ः 75 लाख रुपयांचे हिरे घेऊन पोबारा करणाऱ्या रिशब छाजेड हा हिरे व्यापारी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. मोबाईल फोनला रेंंज येत नसल्याचा बहाणा करुन हा दलाल फोन करण्याच्या बहाण्याने पंचरत्न इमारतीतून पळून गेला होता. त्याच्याकडून हिरे जप्त करण्यात आलेले नाहीत.
 
सैफ अली खानची मुलगी मराठी नाटकात
मुंबई (प्रतिनिधी) ः अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा खान मराठी नाटकात काम करीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिध्द चित्रांगदा या कादंबरीवर बेतलेल्या चित्रांगदा या नृत्यनाटिकेत साराने काम केले आहे. तिला आशिर्वाद देण्यासाठी खास सैफ अली खान प्रभादेवीच्या रवींद्र नाटयमंदिरात उपस्थित राहिला होता. त्यावेळी त्याच्यासोबत करीना कपूरही होती. या दोघांनी अगदी मनमुरादपणे या नृत्यनाटिकेचा आस्वाद घेतला.
 
राज्यात 10 पालिकांसाठी 9,732 उमेदवार रिंगणात
मुंबई (प्रतिनिधी) ः येत्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकांसाठी 10 हजार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माघारीची मुदत संपल्यानंतर 10 ठिकाणी मिळून 9,732 उमेदवार मैदानात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी प्रत्येक प्रभागात किमान चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होतील.
 
ठाणे
पंचायत समितीच्या मतदानावर चार गावांचा बहिष्कार
डोंबिवली (प्रतिनिधी) ः मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ग्रामीण भागात मनमानीपणे आरक्षणे टाकून शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी उंबार्ली, भाल, द्वारली, आडिवली या चार गावांतील ग्रामस्थांनी आज होणाऱ्या पंचायत समिती व ठाणे जिल्हा परिषदेच्या मतदानावर कडकडीत बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे.
 
टीएमटी बस- दुचाकी अपघातात महिला जागीच ठार
ठाणे (प्रतिनिधी) ः ठाणे परिवहन बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी कोर्टनाका परिसरात घडली आहे. कोर्टनाक्यापासून वळण घेताना हा प्रकार घडला असून परिवहनच्या वाहनचालकाला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. मयत तेजल हडकर (33) या आपली नणंद अरुंधती हडकर (26) हिच्याबरोबर डिओ (एम.एच.04 सी.एन. 3144) या दुचाकी वाहनावरुन ठाणे स्थानकाकडे जात असताना ठाणे परिवहनच्या बसच्या चाकाखाली तेजल हडकर आल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ठामपाची मतमोजणी
ठाणे (प्रतिनिधी) ः मतदानाच्या दिवशीच मतमोजणी घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतल्याने अखेर ठाणे महापालिका निवडणुकीची मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मतमोजणी जी- इलेक्ट पध्दतीनेच होणार असल्याचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी स्पष्ट केले आहे.
 
मनसेतील असंतुष्टांना धर्मराज्य पक्षाकडून उमेदवारी
ठाणे (प्रतिनिधी) ः ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर मनसेमध्ये इच्छुकांच्या नाराजीचा स्फोट झाला. मनसेच्या या नाराजांना राजन राजे यांच्या धर्मराज्य पक्षाने आपलेसे केले असून, दोन बंडखोर मनसे कार्यकर्त्यांना उमेदवारीही दिली आहे. त्यामुळे ठाण्यात मनसेचेच आजी- माजी कार्यकर्ते एकमेकांना भिडणार असल्यामुळे निवडणुकीची चुरस अधिक वाढली आहे.
 
सिंधुदुर्ग
ना. राणे हे वाल्मिकी नव्हेत : पुष्पसेन सावंत
कुडाळ (प्रतिनिधी) ः नारायण राणे पोलीस संरक्षणाशिवाय बाहेर फिरुच शकत नाहीत, असे सांगत राणे यांच्यापासून आमदार दीपक केसरकर यांना धोका आहे, असा आरोप माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुष्पसेन सावंत यांनी म्हापण तिठा येथील प्रचारसभेत केला. ना. राणे वाल्याचा वाल्मिकी झाले, असे वाटत होते. पण ते वाल्मिकी झाले नाहीत हे त्यांनी प्रचार सभेतील भाषेवरुन दाखवून दिले.
 
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दिवस येणार : शंकर कांबळी
सावंतवाडी (प्रतिनिधी) ः काही दिवस जनता दल, शिवसेनेचे होते. आता जिल्ह्यात काँग्रेसचे दिवस संपले आहेत. राष्ट्रवादीचे दिवस येणार आहेत, असा विश्वास माजी आमदार शंकर कांबळी यांनी आज येथे व्यक्त केला. शिरोडयात कांबळीसमर्थक शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. येथील आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.
 
वृध्दाच्या खिशातील पैसे लंपास करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला चोपले
मालवण (प्रतिनिधी) ः मालवण शहरातील सोमवारी आठवडा बाजारात वृध्दाच्या शर्टाच्या खिशातील पैसे घेऊन हातसफाई करत पळून जाणाऱ्या गोलू टिकमया परप्रांतीय युवकाला मालवणातील नागरिकांनी पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. कोळंब येथील हॉटेल मालवणीचे मालक बापू कोळबकर हे बाजारपेठेत आजरा बँकेसमोर भाजी खरेदी करत असताना त्यांनी हातातील सामानाच्या पिशव्या खाली ठेवल्या. याचा अंदाज घेत परप्रांतीय युवकाने त्यांच्या बेसावधपणाा फायदा उठवत शर्टाच्या खिशातील 3,800 रुपयांची रोकड लंपास केली होती. पकडल्यानंतर या युवकाने आपण मुका असल्याचे नाटक केले. परंतु चोप दिल्यानंतर त्याचे खरे रुप उघड झाले.
 
सिंधुदुर्ग किल्ल्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी
मालवण (प्रतिनिधी) ः सिंधुदुर्ग किल्ल्यातील विक्रेत्यांनी किल्ल्यात सिगारेट व गुटखा असे तंबाखूचे पदार्थ विक्री करु नयेत तसेच स्थानिक विक्रेत्यांनी त्याच्या विक्रीतून निर्माण होणारा कचरा व कचराकुंडयांची साफसफाई स्वत: करावी, असा निर्णय सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशी संघाच्या सभेत घेण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशी संघाची सभा नुकतीच झाली. या सभेत 6 ऑक्टोबर 2011 पासून किल्ला रहिवाशी संघाने किल्ल्यात राबवलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
 
 

  आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा
  Name *
 
  Email ID
 
  Contact No. *
 
  City
 
  Comments
 
  * Mandatory Fields
  Developed by SoftLogic
दिनांक: 07-02-2012
> जिल्हा विकासाच्या स्वप्नातील शिलेदार ठरवण्यासाठी मतदान सुरु
> कलाकाराने करियर आणि हौस यातील मध्य स्वीकारला पाहिजे : ऍड. विलास पाटणे
> दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या
> चिरा भरलेला ट्रक उलटून कामगार महिलेचा मृत्यू
> सात्वीणच्या रानात सापडला मानवी सांगाडा
> भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस आणि तालुकाध्यक्षांनी दिले राजीनामे
> जेलमधून पळालेल्या आरोपीला युपी पोलिसांनी दिले सोडून
> सार्वजनिक बांधकाम आणि रनपच्या वादात दुभाजकावरील लॉन करपतेय
> काळबादेवीत वाळू माफियांकडून ग्रामस्थांना मारहाण
> शिरगावातील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्रीराम भावे यांचे निधन
> शहरात अनधिकृत हातगाडयांचा सुळसुळाट
> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी चिपळूणला अधिक पसंती
> भाटये येथील रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना होतोय धुळीचा त्रास
> जैतापूर अणुऊर्जा विरोधातील आंदोलनात फूट पाडण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न
दिनांक: 06-02-2012
> प्रचार थांबला, शेवटच्या रात्रीवर खिळल्या सर्वांच्याच नजरा
> क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बुक केले चिपळुणातील परशुराम हिल्स येथे घर
> गॅरेजमधील दुचाकीला अचानक आग, 3 जखमी
> गोवळकोटचे वाळू व्यावसायिक निसार कटमाले यांची आलिशान गाडी जळून खाक
> खराब हवामानामुळे ना. राणे यांचे हेलिकॉप्टर उतरले नाही
> पालकमंत्र्यांना विकासाचे काहीच देणेघेणे नाही : खा.डॉ. निलेश राणे
> निवडणुकीच्या काळात 600 नागरिकांना विशेष पोलीस अधिकार
> अंगावरुन पोकलेन गेल्याने झोपलेल्या कामगाराचा चिरडून मृत्यू
> हातिसच्या उरुसाला लोटतेय अलोट गर्दी
> जि.प., पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर
> तटरक्षक दलाची अमृत कौर नौका पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची झुंबड
> स्वामी समर्थ नामाच्या प्रचारासाठी स्वामी दिगंबर भाटकर यांच्याकडून सेवामार्गाची निर्मिती
> सध्याचे उबदार वातावरण आंबा पिकांना ठरणार पोषक
> ईद ए मिलादनिमित्त शहरात मुस्लिम बांधवांनी काढली मिरवणूक
> रत्नागिरीच्या डॉ. नाहीदा शेख यांनी भाजप प्रचारासाठी 5 राज्यांत घेतल्या 40 सभा
> रोझ सोसायटीच्या स्पर्धेत डॉ. मुकुंद पानवलकर किंग आणि ज्योती डोंगरे क्वीन ऑफ शो
दिनांक: 05-02-2012
> कोकणासाठी निधी दिल्यास मी राष्ट्रवादीची टीका सहन करेन अन्यथा नाही : ना. राणे
> रस्त्यावरील 30 विक्रेत्यांवर रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई
> गवळीवाडयातील पापुली खून प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
> मोबाईल शॉपी फोडून पळणाऱ्या चोरटयास संगमेश्वर पोलिसांनी पकडले
> मतदानाच्या वेळी ओळख पटवण्यासाठी मतदाराकडे दस्तऐवज हवाच
> तटरक्षक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात
> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 220जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
> भाटयातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
> हातिसच्या ऊरुसासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीकडून व्यवस्था
> विद्यार्थी हीच देशाची संपत्ती : दादा इदाते
> स्वाभिमानी कोकणी माणूस राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून देईल : रामदास कदम
> खावडी गुरववाडीतील जनावरे विचित्र आजाराने दगावू लागली
> दंगली घडवणाऱ्यांना हद्दपार करा : पालकमंत्री भास्कर जाधव
दिनांक: 04-02-2012
> पालकमंत्र्यांनी ना. राणेंची माफी न मागितल्यास त्यांचा पाठलाग सुरुच : खा. निलेश राणे
> रत्नागिरी शहराला अगदी पावसाळयापर्यंत दर सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही
> लाच घेतल्याप्रकरणी खेडचे तहसीलदार संतोष जाधव व उपलेखापाल निर्दोष मुक्त
> जि.प., पं.स. निवडणुकीचा प्रचार 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री संपणार
> जालगावच्या युगंधरा धाडवे यांना स्त्रीशक्ती पुरस्कार जाहीर
> खेड नायब तहसीलदार यांच्याविरुध्द राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुखाची तक्रार
> फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची निती दोन्ही काँग्रेस वापरतायत : खा. गीते
> आंबा मोहरावरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून सर्वेक्षण सल्ला प्रकल्प
> लांजा पूर्व भागात बिबटयाचा उच्छाद, 19 शेळया फस्त
> वैशाली पाटील जिल्हा बंदी प्रकरणाची डीवायएसपींसमोरील सुनावणी पूर्ण
> राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेत गोगटे कॉलेजची हॅट्ट्रीक
> महामार्गावर जानेवारी महिन्यात झालेल्या 16 अपघातांमध्ये 14जणांचा मृत्यू
> कृषी क्षेत्रात जिल्हा मागास राहण्यास कृषी अधिकारी जबाबदार : राजाभाऊ लिमये
दिनांक: 03-02-2012
> कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
> राजापुरातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल
> जिल्ह्याचा कारभार लोकाभिमुख आणि नियमानुसारच होणार : जिल्हाधिकारी जाधव
> 10 ते 12 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत भिन्नमती मुलांचे राष्ट्रीय स्नेहसंमेलन
> वीजपुलावर टेम्पो आदळून उलटल्याने वीजपुरवठा खंडीत आणि वाहतूकही ठप्प
> मॅक्स पिकअपच्या धडकेने सायकलवरील दोघेविद्यार्थी जखमी
> जि.प., पं.स. निवडणुकीसाठी वापरली जाणारी 3,536 मतदान यंत्रे
> एसटीतील प्रवाशाकडून वाहकाला मारहाण
> शिवसेना उमेदवार शशिकांत चव्हाण यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा
> वाटद जि.प. गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून होतेय आचारसंहिता भंग
> फोडाफोडी करणाऱ्या राष्ट्रवादीला मतदारांनी जागा दाखवून द्यावी : खा. अनंत गीते
> मंडणगडातील घर आगीत खाक
> चार बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी
> डोक्यात कोयती मारल्याने एकजण जखमी
दिनांक: 02-02-2012
> रत्नागिरीच्या जेलमधून पळालेला अनुजकुमार चौहानला युपीत पकडले
> जिल्ह्यातील 511 ग्रामपंचायती होणार लवकरच ऑनलाईन
> काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
> जनतेने आपल्यावरील प्रेम कायम ठेवावे : आम. सुर्यकांत दळवी
> एक चूकही आयुष्य उध्वस्त करु शकते : अप्पर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर
> बंडखोरी करणाऱ्या पं.स. सदस्य, सरपंचासह चौघांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
> उद्योग प्रगतीसाठी वाकेन पण मोडणार नाही ही कृष्णनिती आवश्यक : डॉ. जाखोटीया
> विहीर बांधकाम ठेकेदाराला कोसळलेल्या विहिरीची नुकसानभरपाई देण्याचे आदेश
> राज्य विज्ञान प्रदर्शनात रत्नागिरी जिल्हा प्रथम
> दोन मृत खलाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाखाची मदत
> मागेपुढे पोलीस घेऊन फिरणाऱ्यांनी दहशतवादाची भाषा करु नये : पालकमंत्री जाधव
> थंडी झाली कमी
दिनांक: 01-02-2012
> रिक्षाभाडयावरुन मारहाण करणाऱ्या तिघांना अटक
> दापोलीतील नयनरम्य निसर्ग सौंदर्याची भुरळ : अजित आगरकर
> चिपळुणातील ओंकार संगीत साधना केंद्र सुरु करणार इ-लर्निंग उपक्रम
> तहसील कार्यालयाच्या पहारेकऱ्याला युवकांकडून मारहाण
> पालकमंत्र्यांसारखे आम्ही गद्दार नाही : आम. रामदास कदम
> कर्ला गणातील अपक्ष उमेदवार सचिन सावंतदेसाई यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा
> राष्ट्रवादीचे माजी सरपंच लाईफ फोंडू काँग्रेसमध्ये दाखल
> भेट मोबाईलच्या सोडतीत नाचण्यातील रिक्षा व्यावसयिक ठरला नॅनोचा भाग्यविजेता
> आंबवली येथील महिला बेपत्ता
> राजापुरातील कबड्डी स्पर्धेत गुहागरचा नम्रता प्रतिष्ठान संघ ठरला विजेता
> आम. उदय सामंत यांनी बंडखोराला उमेदवारी दिली : विकास पाटील
> रत्नागिरी, सिंधुदुर्गातील उद्योगबंदी मार्च अखेरपर्यंत वाढवली
>जयपूर फूटने दिली अपंगांना संजीवनी
दिनांक: 31-01-2012
> पवार कुटुंबाला कोकणाविषयी नेहमीच आपुलकी : सुप्रिया सुळे
> जि.प., पं.स.च्या 171 जागांसाठी 604 उमेदवार निवडणूक रिंगणात
> ट्रकखाली सापडून सायकलस्वार बालकाचा मृत्यू
> बंडखोर उदय बने यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी
> चिपळूणच्या प्रसाद काणे यांना कै. कृष्णामामा महाजन पुरस्कार जाहीर
> जि.प., पं.स. निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची लढाई : पालकमंत्री
> राष्ट्रवादीचे प्रकाश रसाळ यांचा उमेदवारी अर्ज न्यायालयाने ठरवला अवैध
> कोकणकन्या चोरी प्रकरणी आणखी एकाला अटक
> गद्दारांना शिवसैनिक जागा दाखवून देईल : रामदास कदम
> मिनी बसला अपघात होऊन पुण्यातील 20 विद्यार्थी जखमी
> मिरकरवाडा बंदरात पुन्हा साचला गाळ
> वैशाली पाटील तडीपार नोटीस प्रकरणी 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी
दिनांक: 30-01-2012
> रत्नागिरीतील ठेकेदाराच्या खुनाचा कट उघड
> दुषित पाणी प्यायल्याने वाकेड गावातील 20जणांना गॅस्ट्रोची लागण
> दापोली तालुक्यातून उल्हास मोरे यांनी पाठवली पहिली आंब्याची पेटी
> काँग्रेसचे पदाधिकारी ऍड. नाचणकर यांचा शिवसेनेत प्रवेश
> लांजा आगारातील 36 चालकांचा विनाअपघात सेवा बजावल्याबद्दल सत्कार
> गुहागरच्या अरबी समुद्रामध्ये आढळलेल्या दगडी भिंतीचे संशोधन थांबणार
> कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाडयांचे वेळापत्रकात बदल
> जीवनाची एक्झिट म्हणजेच मृत्यू सस्पेन्स असावा : अभिनेता अतुल कुलकर्णी
> विजय वाघमारे यांना ज्ञानाचार्य पुरस्कार
> संजय कदम यांना म. ज्योतीबा फुले पुरस्कार
> आर्ट सर्कलतर्फे आयोजित कलाजत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
> दापोलीतील कॅरीबॅग निर्मूलन मोहिमेवर विशेष माहितीपट
दिनांक: 28-01-2012
> रामपूर गटातील राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य आणि सरपंच काँग्रेसमध्ये दाखल
> दापोलीत मारुती रिट्झ कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
> तरुणाकडील सोन्याची मोड लुटून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
> बैल आडवा आल्याने मोटरसायकल घसरुन तिघे जखमी
> बिबटयाने फस्त केले वासरु
> जि.प. चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकनाथ पाडावे यांचे निधन
> गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर अनुभवा हेलिकॉप्टर राईड
> 8 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश
> थिबा राजवाडयात साकारणार मध्ययुगीन जहाज गॅलरी
> जैतापूर प्रकल्प भविष्यात फायदेशीर : डॉ. अनिल काकोडकर
> राजापूर व्यापारी संघाच्या उपाध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा
> विकासासाठी भाकरी परतवा : पालकमंत्री भास्कर जाधव
> चित्रपटांच्या शुटींगसाठी निर्मात्यांकडून दापोलीला दिली जातेय पसंती
दिनांक: 27-01-2012
> सागरी नौका भ्रमण मोहिमेचा परतीचा दुसरा टप्पा सुरु
> आर्ट सर्कलच्या कला संगीत महोत्सवाचे आज उद्घाटन
> गोगटे कॉलेजचा संशोधन प्रकल्प राज्यात तिसरा
> बाजारात भाजी अजुनही महागच
> 28, 29 जानेवारीला लोकमान्य टिळकांच्या गावी ग्रंथालय संघाचे अधिवेशन
> डीकॅडमध्ये बारा बलुतेदारांच्या पुतळयांचे काम वेगात सुरु
> महिपतगडाच्या रक्षणासाठी राजू काकडे सर्प समितीची मोहीम
> गणवेशासाठी कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
> भारतातील पहिले फिरते डिजिटल तारांगण रत्नागिरी मुक्कामी
Web Site Developed & Maintained by
SoftLogic : 02352-221314, +919422429631
Web Site Developed & Maintained by SoftLogic, Ratnagiri
     
1031, Narayan Leela, Jaysthambh, Ratnagiri, Maharashtra, India.
Fax : (02352) 222861, Mob. 9422052508.
Email ID : editor@konkantoday.com, konkantoday@rediffmail.com, konkantoday@yahoomail.com
eXTReMe Tracker